कृष्णा-पंचगंगेच्या
संगमावर श्री क्षेत्र नृसिंहवाडी वसलेले आहे.श्री नृसिंहसरस्वती यांनी
नरसोबावाडी येथे बारा वर्ष तपश्चर्या करून आपल्या पादूका स्थापन
केल्यामुळे या स्थानास तपोभूमी असेही म्हणतात.
कृष्णा
नदीच्या तीरावर औदुंबराच्या वृक्षाच्या छायेखाली श्री नृसिंहसरस्वती
मंदिर आहे.मंदिरात पादूकांच्या रूपात श्रीदत्तात्रेय भगवंतांचे वास्तव्य
आहे.
मंदिर
परिसरातील छोटी-छोटी मंदिरे व घाट पाहताना मन तृप्त होऊन
जाते.पौर्णिमेच्या दिवशी हजारो भाविक श्री क्षेत्र नरसोबावाडी येतात तर
दत्तजयंतीच्या दिवशी लाखो भाविकांची येथे उपस्थिती असते.नरसोबावाडीचे पेढे,
कवठाची बर्फी आणि बासुंदी प्रसिध्द आहे.कोल्हापूरहून चाळीस कि.मी.तर
सांगलीतून पंचवीस कि.मी.अंतरावर नरसोबावाडी आहे.जयसिंगपूर रेल्वे
स्टेशनपासून अवघ्या पंधरा कि.मी.नरसोबावाडी आहे.
No comments:
Post a Comment