दर्याराजे कान्होजी आंग्रे
कान्होजीराजेंचा जन्म इ.स.१६६७ साली झाला.दर्याचा शिवाजी अशीही कान्होजीराजेंची ओळख आहे.कान्होजीराजे हे भारताच्या इतिहासातील प्रसिद्ध नाविक योद्धा होते.पुणे जिल्ह्यातील काळोसे हे त्यांचे मूळ गाव व संकपाळ हे मूळ आडनाव.काळोसेतील आंगरवाडी या भागामुळे त्यांच्या कुळास आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले.कान्होजींचे वडील तुकोजी यांना छत्रपती शिवाजीराजेंच्या आरमारात २५ असामींची सरदारी होती.
औरंगजेब
मराठ्यांना जिंकण्यासाठी १६८१ च्या अखेरीस महाराष्ट्रात आला. त्याच
सुमारास कान्होजींच्या कोकणपट्टीतील कार्यास सुरुवात झाली होती. १६९४ ते १६९८ पर्यंत कान्होजींनी कोकणपट्टीतले मोगलांनी व इतरांनी काबीज केलेले मराठ्यांचे सर्व किल्ले जिंकून घेतले.छत्रपती राजारामांनी
त्यांची ही कामगिरी पाहून त्यांना सरखेल हा किताब दिला.१६९६ मध्ये त्यांनी
कुलाबा किल्ला जिंकून ते आपले मुख्य ठाणे केले.
पुढे
छत्रपती राजारामांनी त्यांस मराठी आरमाराचा मुख्याधिकारी केले.
राजारामांच्या मृत्यूनंतर (१७००) थोड्याच वर्षांत शाहूंची सुटका होऊन १७०७
मध्ये ते छत्रपतींच्या गादीवर आले. त्या दरम्यान राजारामांची पत्नी
ताराबाई व पुतणे शाहू ह्यांत गादीबद्दल तंटा सुरू झाला होता.कान्होजींनी
महाराणी ताराबाईंचा पक्ष घेऊन १७०७ ते १७१० च्या दरम्यान अनेक विजय
मिळविले.
कान्होजी आंग्रे यांचे शिल्प ·
ताराबाईंनी
सावंतवाडी ते मुंबईपर्यंतच्या किनाऱ्याच्या संरक्षणार्थ मराठी आरमाराचे
प्रमुख म्हणून कान्होजींना नेमले आणि इंग्रजांच्या मदतीने शाहूंनी
कोणतीही हालचाल करू नये, या हेतूने राजमाचीचा किल्ला व भिवंडी प्रांताचा
बंदोबस्त करण्यास कान्होजींना सांगितले.इ.स. १७१३ साली शाहूंनी कान्होजीं विरुद्ध बहिरोपंत पिंगळे ह्यांस धाडले. कान्होजींनी त्यांचा पराभव करून त्यांस कैद केले.त्यामुळे
छत्रपती शाहूंनी बाळाजी विश्वनाथ या पेशव्यास कान्होजींवर धाडले. बाळाजीने
कान्होजींबरोबर सलोखा करून तह केला. त्यात कान्होजींस कोकणकिनारपट्टीचे
सर्व किल्ले मिळाले व त्यांनी छत्रपती शाहूचे अंकित बनून सालिना १२,०००
रु. त्यास देण्याचे ठरले.त्याशिवाय त्यांची सरखेली कायम ठेवण्यात आली तसेच
मराठी आरमाराचे सर्व आधिपत्य त्यांस दिले.अशा प्रकारे ते शाहूंच्या पक्षात
सामील झाले व अखेरपर्यंत त्यातच निष्ठेने राहिले.
कान्होजींची
सत्ता कोकण किनाऱ्यावर कोट मांडवेपासून त्रावणकोरपर्यंत पसरली. ही गोष्ट
तत्कालीन इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज व डच ह्या परकीयांस आणि
जंजिऱ्याच्या सिद्दीस बोचत होती. इंग्रज, डच, पोर्तुगीज व फ्रेंच ह्यांनी
कधी स्वतंत्रपणे, तर कधी संयुक्त रीत्या त्यांवर चढाई केली. पण प्रत्येक
वेळी त्या सर्वांचा पराभव झाला. आंग्र्यांच्या अंमलाखालील सागरी
प्रदेशांतून जाणाऱ्या जहाजास दस्तक (परवाना) घ्यावयास भाग पाडून समुद्रावर त्यांनी आपले निर्विवाद स्वामित्व प्रस्थापिले आणि सिद्दीस वारंवार माघार घेण्यास भाग पाडले.
कुलाबा
व विजयदुर्ग येथे जहाजे बांधण्यासाठी त्यांनी गोद्या बनविल्या. त्यांची
जहाजे कच्छपासून त्रावणकोरपर्यंत सागरात निर्वेधपणे संचार करीत.कान्होजी
सुद्दढ व प्रेमळ होते. तथापि त्यांचे हुकूम सक्तीचे व शिक्षा कडक असे.
त्यांना मथुराबाई, लक्ष्मीबाई व गहिनाबाई या तीन धर्मपत्नी होत्या.
त्यांना सहा मुलगे झाले. असा हा सागरी अनभिषिक्त राजा अलिबाग येथे मरण
पावला. त्यांच्या मरणानंतर त्यांच्या मुलांत तंटे सुरू होऊन पुढे आंग्रे घराण्याची वाताहत झाली.
कान्होजी आंग्रे यांची समाधी
No comments:
Post a Comment