पंढरपूरचे
विठ्टल मंदिर हे अत्यंत प्राचीन आहे.हे महाराष्ट्रातील प्रमुख
तीर्थक्षेत्र आहे.मंदिराचे बांधकाम खुप सुबक आणि सुंदर आहे.मंदिर प्राचीन
शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.भीमा नदीच्या तीरावर वसलेल्या पंढरपूरला
दरवर्षी लाखो वैष्णव न चुकता यात्रा करतात.
पंढरपूरला
आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री अशा चार मुख्य यात्रा असतात.
यात्रेच्या कालावधीत अनेक संताच्या दिंड्या पायी चालत आपल्या लाडक्या
विठूरायाला भेटावयास पंढरपुरला येतात.
पंढरपूर
येथील मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे येथे विठ्ठलाचे व रुक्मिणीचे मंदिर
वेगवेगळे आहे.पुण्यापासून पंढरपूर हे अंतर २२० कि.मी. आहे.तर सोलापूर
पासून ७० कि.मी आहे.
No comments:
Post a Comment