संत
तुकडोजी महाराज यांची ओळख राष्ट्रसंत अशी आहे. अंधश्रद्धा निर्मूलन,
जातिभेद निर्मूलन यावर त्यांनी भजन आणि कीर्तनातून आसूड ओढले.खंजिरी भजन हे
त्यांचे वैशिष्ट्य होते. अध्यात्मिक,सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेसाठी
त्यांनी भारतात व परदेशात जपानसारख्या देशात प्रबोधन केले.भारत हा
खेड्यांचा देश असल्यामुळे ,ग्रामविकास झाला तरच देशाचा विकास होईल अशी
त्यांची धारणा होती.ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी त्यांनी विविध योजना
सुचवल्या तसेच त्या अमलात सुध्दा आणल्या.'ग्रामगीता' या त्यांच्या
साहित्यकृतीत त्यांनी त्या नमूद केल्या आहेत.'सेवास्वधर्म','राष्ट्रीय
भजनावली','अनुभव सागर भजनावली' या त्यांच्या आणखी काही साहित्य कृती होत.
मूळ नाव -माणिक बंडोजी इंगळे
जन्म -२७ एप्रिल, १९०९ समाधी / मृत्यू -११ ऑक्टोबर, १९६८ साहित्यरचना- ग्रामगीता, अनुभव सागर भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली गुरू -आडकोजी महाराज |
|
अमरावतीजवळ मोझरी येथे त्यांनी गुरुकुंज
आश्रमाची स्थापना केली.स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत .खेडेगाव स्वयंपूर्ण
होण्यासाठी त्यांनी ग्रामगीते माध्यमातून महत्वाचे कार्य केले.अंधश्रध्देवर
त्यांनी त्यांच्या लेखनातून ,कीर्तनातून प्रहार केले.त्यांनी
मराठीप्रमाणंच हिंदी भाषेतही विपुल लेखन केलं.राष्ट्रपतिभवनात त्यांचे
खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना
राष्ट्रसंत म्हणून संबोधिलं होतं. ग्रामगीता या काव्यात तुकडोजी महाराज
म्हणतात;
संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।
साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।
संत तुकडोजी महाराज यांचे एक प्रसिध्द भजन पुढीलप्रमाणे आहे.
या झोपडीत माझ्या राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्यादारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आलाभितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥
महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जाकोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥
पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजेशांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥
आयुष्याच्या
अखेरपर्यत त्यांनी आपल्या खंजिरी भजनाच्या माध्यमातून आपल्या विचारसरणीचा
पुरस्कार केला,त्यायोगे त्यांनी आध्यात्मिक,सामाजिक तसेच राष्ट्रीय प्रबोधन
केले.स्वातंत्र्य चळवळीसाठी त्यांना कारावासही भोगावा लागला.अशा या महान
राष्ट्रसंताने ११ ऑक्टोबर, १९६८ रोजी देह ठेवला.त्यांचे विचार आजही
त्यांच्या अनुयायांनी जिवंत ठेवले आहेत.
No comments:
Post a Comment